Monday, 1 October 2018

Cook A Curry' - Ready to mix oil based curry paste, अतिशय प्रोत्साहनकारक feecback मिळालेलं आमचं नवीन product, अवघ्या काही मिंटातच अस्सल Indian taste देणारी जादू, की आईचं स्वप्न पूर्ण करण्याची आमची जिद्द- ह्या पैकी नेमकं काय आहे Cook A Curry? मला विचाराल तर सगळच! 
कुठलंस एक स्वप्न असतं मनात- ते पूर्ण करण्याचा एक निश्चयही असतो आणि अअचानक एके दिवशी तो निश्चय कल्पनेतून वास्तवात उतरतो! तसंच काहीतरी झालं साधारण वर्षभरा पूर्वी- घरातल्या trials, नाव काय ठेवायचं ह्यावर चर्चा, company registration, council clearances, lab checks, मग product ll काही दिवसातच launch - त्याचीच तयारी करायला काल wholesale depot मधे गेलो होतो- सगळं सामान आणलं- Business ला लागणारं आणि घरचं देखील. का कुणास ठाऊक पण एक वेगळाच उत्साह येतो माझ्यात, किराणा माल भरताना...एक वेगळाच आनंद होतो...ते सगळं सामान घरी आणायचं, सगळे डबे काढून, वरचं खाली, खालचं वरती होइल अश्या रीतीने नवीन पाकिटं फोडून, सगळं ज्याच्या त्याच्या डब्यात भरायचं, मग ते लख्खं धुतलेले डबे पुन्हा छान जागेवर लावायचे....रमते मी अक्षरशः ह्या सोहळ्यात...
काल तर केवढं सामान होतं माझ्या भोवती. मी ते सगळं व्यवस्थित लावत होते. घरचं वेगळं ठेवत होते, Business साठी लागणारं inventory stock प्रमाणे लावत होते, यादीतलं सगळं व्यवस्थित आलंय न तपासत होते आणि अचानक ते ओळखीचं feeling सहज मनात डोकावलं- " केवढी ती देवाची कृपा - घरातल्या कोठ्या धान्यानं भरल्या जातायेत; घरातली मुलं, वयस्क, पै पाहुणा, येणारा-जाणारा, कधी माझ्या घरात रिकाम्या पोटी राहणार नाही." ही समाधानाची भावना मला कृतज्ञतेच्या परमोच्च शिखरावर घेऊन गेली आणि नेहमी प्रमाणे डोळे आपोआप पाण्याने भरून आले... खरं तर ही समृद्धी नवीन का होती माझ्यासाठी?! आईच्या पिढीसारखं, महिन्यातून एकदाच किराणा भरायचा आणि महिना अखेरीपर्यंत तो टिकवायचा हा नियम माझ्या संसारात कधीच लागू पडला नव्हता - मनात येईल तो पदार्थ बनवायचा ; त्याला लागणारं सामान, कितीही महाग असलं तरी हवं तेवढं, हवं तेव्हा आणायचं- काटकसर नाही का सगळं सांभाळून, मोजून मापून करण्याचं बंधन नाही...
पण तरीही दर वेळी किराणा भरताना ताईने लग्नाच्या वेळी गौरीहर पुजताना सांगितलेली प्रार्थना आणि "मनापासून म्हण बरं ही " हा दिलेला प्रेमळ सल्ला आठवल्याशिवाय माझे डबे काही जागच्या जागी जात नाहीत ! 
हे माझं अन्न -धान्याने भरलेलं घर , त्या अन्नपूर्णेच्या मनापासून केलेल्या आराधनेचा परिणाम, की माणसात देव बघणाऱ्या आमच्या दोघांच्याही आई बाबांची पुण्याई ? का दोन्ही ? का अनेक वर्षांपूर्वी त्या काकांनी मनापासून दिलेल्या निखळ आशीर्वादाचं स्वरूप ?
ते काका आज कुठे आहे, कसे आहेत, मला माहिती नाही पण ५ -६ वर्षांच्या मला तेव्हाही कुठं काही जास्त माहित होतं ? आम्ही कलकत्ता सोडून कायमचे नागपूरला का आलो , आजी आबा आता सारखे का भेटणार नाहीत , तेव्हा आपली आर्थिक परिस्थिती काय होती, आत्ता काय आहे ; आपले आई बाबा कुठल्या दिव्याला सामोरी जातायेत हे सगळं कळण्याचं वयच नव्हतं - पण एवढं कळत होतं - आता आई बाबांकडे हट्ट नाही करायचा कुठल्या वस्तू साठी - त्यांना त्रास होतो -नाही म्हणता येत नाही पण आणून पण देता येत नाही -मग त्यांना वाईट वाटतं; पण गम्मत म्हणजे हे समजल्यावर त्याचं दुःख व्हावं एवढं सुद्धा वय नव्हतं माझं !
नवीन जागा, नवीन मित्र-मैत्रिणी , घरासमोरची ही भली मोठी गच्ची आणि बाबांना रस्त्यावर सापडलेलं alsatian पिल्लू - आमचा टायगर ! ह्या सगळ्या मध्ये आई बाबांची चाललेली कसरत माझ्या ठायी सुद्धा नव्हती ...मात्र ठायी ठायी भिनला होता तो नागपूरचा पहिला उन्हाळा - होरपळून निघालो होतो आम्ही सगळे.....आणि असाच तो May महिन्यातला दिवस सुरु झाला - तापलेला , अंगातली शक्ती खेचून मलूल करून टाकणारा - सारं चिडिचूप -एक पान हलत नव्हतं कि रस्त्यावर एक काळं कुत्रं दिसत नव्हतं - मिळेल त्या सावलीत , त्या रणरणत्या उन्हापासून प्रत्येक जण आश्रय घेत होतं . आमची समोरची खोली त्या मानाने थंड असायची, म्हणून मी आणि टायगर तिथेच लोळत पडलो होतो ; ताई आपल्याच कुठल्या कामात दंग होती आणि रात्री काही पाहुणे जेवायला येणार म्हणून आई स्वयंपाकघरात होती.तेवढ्यात एक अनोळखी काका दारात येऊन उभे राहिले - घामाघूम, चुरगळलेले कपडे , हातात एक छोटीशी बॅग आणि खूप खूप दमलेले.. "अलका कुळकर्णी ,मामा चितळ्यांची मुलगी , इथेच राहतात का ? " असं त्यांनी विचारल्यावर , मी धूम आत पळ ठोकली आणि मग आईच्या मागे मागे बाहेर आले .त्यांनी आईला एक पत्र दिलं - आबांचं ,माझ्या आईच्या वडिलांचं होतं ते. हे काका कलकत्त्याहून आले होते आणि आबांनी आईचा पत्ता दिला होता त्यांना एवढंच कळलं मला त्या वेळी. आईने त्यांचं चहा पाणी केलं मग ते काका निघाले. जिना उतरून ते फाटकापर्यंत पोचले असतील नसतील , तसं आईला काहीतरी सुचलं आणि तिने ताईला, धावत जाऊन त्या काकांना परत घरी घेवून यायला सांगितलं. ते काका आल्यावर आई म्हणाली, "माफ करा ,मी तुम्हाला जेवायचं विचारलंच नाही - अगदी भान राहिलं नाही मला - मी पान घेते , तुम्ही फ्रेश व्हा आणि जेवायला बसा." 
"दुपारी तीन वाजता कोणी जेवतं का, " हा विचार आलेला आठवतोय मला पण त्या नंतरची आठवण मात्र मी बहुतेक मरेपर्यंत कधी विसरणार नाही ..ते काका जेवायला बसले , आणि घळाघळा रडायला लागले - एक घास घ्यायचे, डोळे पुसायचे; परत एक घास घ्यायचे , परत डोळे पुसायचे ... मला तर काही कळतच नव्हतं - का बरं रडत असावेत ? आईच्या डोळ्यातूनही झर झर पाणी वाहात होतं , ताई पण गंभीर झाली होती - समजत नव्हतं ते मला आणि टायगरलाच ! 
मग समज आल्यावर आईने एकदा सगळी हकीकत सांगितली - त्या काकांनी गुंतवलेला त्यांचा सगळा पैसा अचानक बुडला होता -रातोरात रस्त्यावर आलं होतं कुटुंब - एवढं की एक वेळच्या जेवणालाही मोताद झालं होतं! कलकत्त्याहून निघाले, नागपूरजवळच्या कुठल्याश्या खेडेगावात बायकोला,मुलाला सोडलं कुणा नातेवाईकांपाशी मग आमच्या घरी येऊन परत कलकत्त्याला जाणार होते तिथलं निस्तरायला. दोन दिवसांचा उपाशी होता माणूस - वणवा पेटल्या सारख्या त्या नागपूरच्या धगीत, आमचा पत्ता शोधत वण वण फिरला होता गृहस्थ - 'मामा चितळ्यांची मुलगी' , निव्वळ एवढ्या ओळखीवर, आसरा घ्यायला आला होता जरा वेळ .... 
सांगता सांगता आई रडायला लागली ,"मती गुंग झाल्यासारखी वागले मी - त्या भल्या माणसाला फक्त चहा दिला. "जातो'" म्हंटल्यावर, बरं म्हणाले आणि रात्रीचं सगळं पूर्ण करण्याच्या विवंचनेत स्वयंपाकघरात आले -आणि बहुधा अन्नपूर्णेनीच जागं केलं मला ! कपाळावर हात मारला आणि वैशूला पाठवलं त्यांना परत घेऊन यायला - त्यांना जेवणाचं विचारायला कशी चुकले मी - बुद्धी कुठे गहाण पडली माझी ! ते वर आल्यावर त्यांची माफी मागून त्यांना पानावर बसवलं . दोन दिवस अन्न पोटात नसणाऱ्या माणसाची लाचारी काही वेगळीच असते - कुठला स्वाभिमानी माणूस असा परत येऊन पानावर बसला असता .... पण ते बसले आणि रात्री साठी केलेला सगळा स्वयंपाक वाढला मी त्यांना - कमी पडलं आपल्याला तर पडू दे, पण हा माणूस पोटभर जेवल्या शिवाय उठता कामा नये ... आणि ते जेवलेही पोटभर - प्रत्येक घासानिशी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि प्रत्येक श्वासानिशी जणू आपल्या साठी आशीर्वाद ! त्यांचं पोट शांत झालं ,इकडे सूर्याची अग्नी थंडावली. रात्रीचा डबा घेऊन ते परत कलकत्याला जायला निघाले - बोलले नाही काही पण माझा ठाम विश्वास आहे - आयुष्यात कदाचित खूप गोष्टी कमी पडल्या असतील आपल्याला - त्या कुटुंबाची आणि आपली फार काही वेगळी परिस्थिती नव्हती - पण दोन वेळची पोळी कधी चुकली नाही आपली - पुढचा स्वयंपाक काय करू हा जीव घेणा प्रश्न त्यांच्या आशीर्वादानं कधीच पडला नाही मला - माझ्या घरातली अन्नपूर्णा कायम हसत राहिली आणि माझ्या धान्याची कोठी कायम भरत राहिली ! "
अगं आई , तुझीच काय , माझीही कोठी कधी रिकामी होऊ दिली नाही तिनं - म्हणूनच बहुतेक प्रत्येक वेळी सामान भरताना ही गोष्ट आठवते मला आणि आठवते गौरीहार पुजताना ताईनी सांगितलेली प्रार्थना : 
"गौरी गौरी सौभाग्य दे
घरच्या सगळ्यांना आरोग्य दे
संसारात माझ्या आनंद दे; अन्
दारी येईल त्याला पूर्णान्न दे ! "
त्याच गौरी कडे ,त्याच श्रद्धेने आज पुन्हा मागते 
"गौरी गौरी सौभाग्य दे
Cook A Curry ला आशीर्वाद दे !"
of hard work and legacies
of silent prayers and memories
of dreams and ambitions
of hopes and convictions..
of a promise to be filled
of a new world to be built...
"Cook A Curry" takes its baby step in the world of retail business. 
Now available to pick up from your favourite SKVP centres.

Rajas chi Rashmi

कृष्णाची राधा जशी
ओठा ला बास जशी
गाण्याचा सूर जशी
धरलेला ताल जशी
                      राजसची रश्मी तशी !
कंकणाचा नाद जशी
नथनीचा नूर जशी
पैंजणाची साद जशी
कंठीचा साज जशी
                      राजसची रश्मी तशी !
काजळीची धार जशी
कुंकवाची लाली जशी
अत्तराचा छंद जशी
गजर्याचा गंध जशी
                      राजसची रश्मी तशी !
वार्याचा झोत जशी
किरणांची वाट जशी
पहाटेचे दव जशी
संध्येची वात जशी
                     राजसची रश्मी तशी !                    
श्रावण झड जशी
मातीला सर जशी
थंडीला शेक जशी
उष्मेला छाव जशी
                     राजसची रश्मी तशी !
सौख्याची आस जशी
वृद्धिची प्यास जशी
दुखण्याला दवा जशी
उत्कंठ दुवा जशी
                     राजसची रश्मी तशी !

असण्याचा अर्थ जशी
जगण्याचं सार्थ जशी
लेकीचा लळा जशी
घरची धनलक्ष्मी जशी
                    माझी ग रश्मी अशी !!
This was written for Akka maushi and Appa kaka - on the first valentine after kaka passed away after maushi, but I think i had it in mind even as a 7th grade student when i saw my aaba passing away inch by inch yearning for my departed aaji. No red roses , no romantic candle lit dinners for this couple but the love between them couldn't keep them apart for long....ह्यालाच म्हणतात का ग Valentine ?
आठवतायेत ते दिवस ? नुकतेच आपण भेटलो होतो - 
अस्पष्टच थोडसं पण गालातल्या गालात हसलो होतो … 
नजरेनच एकमेकांच्या मनातलं सारं ओळखत होतो 
समोरासमोर आलो नुसते तरी मनोमन मोहरत होतो ! 
प्रेमाचं आपलं बंधन लग्नाच्या मांडवात घट्ट झालं
मी तुझा नि तू माझी - जन्मोजन्मीच सत्य झालं
तुझी अनेक रूपं रोज मी नव्या नवलाईने न्याहाळत होतो
कले कलेने बहरत होतीस - मी मंत्रमुग्ध बघत होतो !
मुलांचा चीवचीवाट , आई-वडिलांची साथ 
नौकरी , पगार ,जगराहटी - दिवसा मागे रात ! 
मनात होता विश्वास आणि हातात तुझा घट्ट हात 
प्रसन्नपणे तेवत होती आपल्या सुखी संसाराची वात 
सारं कुठे गुलाबी होतं ?! काट्यातूनही चाललो आपण 
आठवतं का -बिछान्यात, पाठ फिरवून रात्रभर केलेलं जाग्रण ?
पण तो रुसवा , तो फुगवा, क्षण भराचा होता
मनवण्याचा सोहळा त्यानंतर किती रात्र चालला ! 
जावई , सुना ,नातवंड आलीत - घरातले 'मोठे ' आता आपण झालो.
पण खरं सांगायचं तर मनातून मात्र, तेच प्रेमी युगल राहिलो ! 
एकत्रच डोळे मिटायचे , असं एकमेकांना नक्की ठेवलं होतं सांगून
पण दोघांनाही माहिती होतं - गेला पुढे एक - तर दुसरा घेईल सावरून...
श्वासात भिनलेली तू - सोडून गेलीस हे पटलंच नाही…
मात्र आयुष्य परिपूर्ण आपलं म्हणून दुखः त्याचं मी केलंच नाही … 
आज पुनर्भेटीच्या वेळी , पुन्हा तुझा होवून येईन - 
अन मोक्ष स्वीकारण्यासाठी देवापुढे सज्ज उभा राहीन ! 
…………ह्यालाच म्हणतात का ग - 'Valentine' ?

My aaji

कैक वर्ष माळ्यावर एक ट्रंक होती आजीची
जड ,भक्कम ,धुळीनं माखलेली -
काळाचे व्रण सोसलेली अन 
असंख्य आठवणी पोटात साठवलेली 
ट्रंक उघडताच दिसला छोट्या आजीचा छोटासा बंब -
त्या बरोबर इवलीशी परात आणि साऱ्या खेळ भांड्यांचा संच .
बाजूलाच होता सुबक अक्षरातला तिचा इंग्रजी कवितांचा संग्रह -
‘दाखवण्याच्या' वेळी, "त्यातलीच म्हण एखादी "- असा झाला असेल का आग्रह?
त्याच पानांमध्ये सापडली
एका गुलाबाची वाळलेली कळी
अल्ह्ड वयातल्या तिच्या पहिल्या पहिल्या प्रेमाची
असावी का ही नाजूक निशाणी ?
आजीचा संसारच जणू ह्या पेटीत सामावलेला
लग्नातलं ताट, बारश्याची वाटी,मुंजीतला पेला ...
एका पिशवीत अलगद गुंडाळून ठेवलेला तिचा मखमली शेला
सोबतीला मुंडावळ्या आणि हिरव्या गार चुड्यातल्या तीन बांगड्या ! 
कशी दिसली असेल माझी आजी नवरी म्हणून?
आबांनी चोरून बघितल्यावर लाल बूंद झाली असेल का लाजून लाजून !
भरल्या डोळ्यानं कशी निघाली असेल कोकणातलं माहेर सोडून
मग नव्या शहरात, नवलाईच्या दिवसात गेली असेल का बहरून - मन मोहरून ?
एक दुपटंही दिसलं पिशवीच्या खाली ठेवलेलं -
दुधा तेलात झिरपलेलं - इतक्या वर्षांनीही बाळाचा वास देणारं
कशी चाहूल लागली असेल आजीला एका नव्या जीवाची ...
गरोदर,टेकलेली - गोड दिसली असेल ना माझ्या आईची माऊली 
तिने घेतलेल्या पहिल्या ट्रान्सिस्टरची रसिदही सापडली तिच्या वहीत
शेवटपर्यंत तिच्या बरोबर होता तो - त्या माडीवरच्या खिडकीत
सर्वात मागे दडून ठेवलेली पत्रही होती खूप सारी
महत्वाच्या टप्प्यांची , तिच्या सुखं -दुःखाची बोलकी झलक देवून जाणारी 
पार तळाशी नीट घडी घालून ठेवलेला होता आबांचा काळा कोट
अंधुकशी आठवते मला ती -
त्याला कवटाळून प्रयत्न करायची आवरण्याचा
आपल्या अश्रूंचा अविरत लोट. 
किती ऋतू ,किती वर्ष,किती पर्व दडलेली होती ह्या पेटीत
शांतपणे बसलेली- एका अस्तित्वाचं सार बंद करून आपल्या मुठीत
मला ठाऊक असलेल्या आजीपेक्षा , आज तिची किती रुपं बघितली मी
कधी चंचल,कधी खंबीर - आणि कोणे एके काळी तर अजाणतीही होती ती ! 
का ग साठवून गेलीस ह्या असंख्य आठवणी
का स्वतःला ठेवून गेलीस अशी थोडीशी माघारी
कारण होती न तुला अगदी नक्की खात्री - एक दिवशी मी ही ट्रंक खाली उतरवीन
तिची धूळ साफ करीन आणि भरल्या गळ्यानं पण हसऱ्या मनानं
मोठ्या दिमाखिनं आजी - तुला घरी घेऊन येईन .
(एक वीरगति, काही अपूर्ण क्षण. ...)
जरा तू थांब ना रे
मन अधीर अजून माझे 
फुलात चालताना
दव कोवळे मनाचे
मनाशी बोलताना
ओले अजून भासे 
आता कुठे बहरली
सायली मांडवात
कळी कळी बहरता
गंधात रात्र जागे 
स्वप्नांच्या अंगणात
उल्केने हळूच यावे
ओंजळीत जाता जाता
एक स्वप्नं सोडून जावे 
गाण्याच्या मैफलीत
मल्हार मधेच मिसळावा
सुरात तुझ्या नि माझ्या
तल्लीन होवून जावा 
पान्हा मुक्या ऊरीत
फुटण्यास वाट शोधे
पंखात पाखरांच्या
बळ थोडे अजून यावे 
जरा तू थांब ना रे
मन अधीर अजून माझे.....
For those of you
who went before your time...
Fell for no fault
no reason nor rhyme
Our hearts beat and bleed for you..
For you and for those who loved you too.....
Go and wait in a peaceful land
We shall follow but first
we have a mission on hand...
We will teach our children to love not hate
But we'll stand up to violence
tall and straight.

Shayari


ऐ वक्त तुम्हें दोस्त कैसे कहें
ना ठेहेरते हो ना वापस आते हो
और दर्द को ही देख लो.


तन का रंग तो छुटेगा
मन रंगा रंगरेज़
दिल है सुना सुना सा
तू बैठा परदेस ....


किस हक से चले आते हो खयालों में यूंही -
जान जाती है हमारी ...
फिर मुस्कुराकर चले जाते हो
कहते हो, बस यूंही ....


ओस की बूंद सी हूं - 
मुश्किल से ठहर पायी हूं कहीं 
पाती बन सको तो देख लो
वर्ना अब हूं , अब नहीं.....


किस हक से चले आते हो खयालों में यूंही -
जान जाती है हमारी ...
फिर मुस्कुराकर चले जाते हो 
कहते हो, बस यूंही ....

लफ्जों को खूब सजाते हो
काश खामोशियाँ समझ पाते !
कभी आखें ही पढ लेते हमारी
तो हम भी जिंदगी जी लेते.....



कहीं लब्ज़ सहम गए
कभी पलकें झुकी रही -
अनकही- सी इक दास्ताँ
फासलों में बसी रही.

तुम्हारे खयालों से आज भी
चहक उठती है मेरी तन्हाई
नादान है वो क्या जाने
हकीकत और तमन्ना- है सदियों से बिछडी हुईं
हर कोशिश, हर साज़िश, तुमसे मिलने की है 
हर ख्वाईश मेरी तेरे दीदार की है.....
फिर भी ना मिल पाये कभी तो कोई शिकवा नहीं
परवाने की तक़्दीर तो जल जाने की है.....

बहोत दूर छोड़ आये तुम्हें , 
अब तो राहें भी धुन्दला गयी ....
किसी मोड़ पे मिल जाओ कभी,गैरमुमकिन है , 
अब तो मंजिले भी तनहा हुई ....

खाव्बों के आइने में कब तक निहारोगे....
कोई एक भी टूट जाये, क्या सँवर पाओगे ??

किसी गलती की सज़ा उम्र भर क्यों हो 
इक सज़ा की उम्र जिन्दगी भर ना हो 
इन्तहा इश्क का मुक्कम्मल क्या हो 
मौत बेहतेरीन है , जिंदगी ना हो ....


तन का रंग तो छुटेगा 
मन रंगा रंगरेज़
दिल है सुना सुना सा
तू बैठा परदेस ....


तन का रंग तो छुटेगा 
मन रंगा रंगरेज़
दिल है सुना सुना सा
तू बैठा परदेस ....


तन का रंग तो छुटेगा 
मन रंगा रंगरेज़
दिल है सुना सुना सा
तू बैठा परदेस ....
चिरंजीव होवो जन्म 
आजन्म हाच उमंग 
गुंतून मनात बहरावे
हे बंध रेश्माचे ! 


मी :
सहज ओळख करून देताना म्हणालास ,
"ही माझी मैत्रीण"
निनादला तो शब्द कानात -
पण त्याचा अर्थ समजावून सांगशील ? 
तो :
मैत्रीण - ही ओळखच किती गोड आहे
नुसत्या नावामध्ये सुद्धा एक अनामिकशी ओढ आहे 
न बोलताच कळण्याची ,अबोलशी जाण आहे
हलकंसं हसली जरी - संवाद परिपुर्ण आहे !
मनातलं सारं उमगावं , तिच्या डोळ्यातच तो ठाव आहे
स्वप्नामध्ये वसलेलं असं दोघांचंच एक गाव आहे 
साऱ्या नात्यांहून सोवळा - तिचा आगळाच एक मान आहे
न मागता दिलेला निरागस अधिकार आहे 
ती नसली जरी भवती तरी सुंदरसा भास आहे
मनामध्ये रुजलेली कृष्णेचीच आस आहे 
ओळखीच्या गर्दीत ती एकटीच उभी छान आहे
मन मोकळं वागावं - मी तिच्या सवे लहान आहे !
अंग अंग भिजले तरी उरलेली तहान आहे
पूर्णत्व नकोच,तिची त्यातच खरी बात आहे.....





सखा - ही ओळखच किती गोड आहे
नुसत्या नावामध्ये सुद्धा एक अनामिकशी ओढ आहे 
न बोलताच कळण्याची ,अबोलशी जाण आहे
हलकंसं हसला जरी - संवाद परिपुर्ण आहे !
मनातलं सारं उमगावं , त्याच्या डोळ्यातच तो ठाव आहे
स्वप्नामध्ये वसलेलं असं दोघांचंच एक गाव आहे 
साऱ्या नात्यांहून सोवळा - त्याचा आगळाच एक मान आहे
न मागता दिलेला निरागस अधिकार आहे 
तो नसला जरी भवती तरी सुंदरसा भास आहे
मनामध्ये रुजलेला श्रीरंग तोच आहे 
ओळखीच्या गर्दीत तो एकटाच उभा छान आहे
मन मोकळं वागावं - मी त्याच्या सवे लहान आहे !
अंग अंग भिजले तरी उरलेली तहान आहे
पूर्णत्व नकोचरे.....हा प्रवासच फार गोड आहे 
छोट्या छोट्या आठवणीत हरवलेले क्षण
तिथेच कुठे अडकलेले हळवे नाजूक मन... 
कोवळ्या कोवळ्या किरणांमधून डोकावणारे कण
निष्फळ त्यांना बांधण्याचे पोकळ ते जतन !
झुळझुळणाऱ्या नदीच्या सोबत असतो काठ
पण पाणी पुढे व्हायले तरी राहतोच ना तो ताठ... 
गंध चोरून वारा वाहतो - घे ना भरून श्वास
फुलाला त्या खुडण्याचा का तो वेडा ध्यास !
लुकलुकणाऱ्या चांदण्यांशी साध जरा हितगूज
उगाच त्यांना मोजताना निजून जाशील तूच ! 
लपाछपीचा चंद्राशी खेळ ना एकदा डाव
मोट्ठ्या सारखं वागण्याचा निखळू दे ना आव... 
हुळहुळणाऱ्या जखमांशी ठेवतोस का रे नातं
दुःखच मिळतं जिथून ती धरावीच का वाट ?
चल गड्यारे , आला पाऊस, भीजून घेना चिंब...
कुणास ठाऊक कधी सुटावा मनकवडा संग !
जीने का रुतबा तो गुम हो चुका है
बाकी है गम का गुरूर ....
दुनिया ने हमको ना जाना ना माना
हुआ हमसे कैसा कुसूर 
चीखी लकीरें तो गुंजा अंधेरा
बस्ती तो फिर भी है सोई
है छत जो टूटी तो बेहता है पानी
आँखों की सूनी है खाई
वो जो है रूठा तो हर सच है झूठा
किस्सा तो हर आजमाया
कुदरत से मांगा किस्मत से चाहा
मगर हमने गुर्बत ही पाईं 
गीला है चूल्हा बर्तन है सुखा
औंधी पडीं चारपाई
दुआ में बुलाया, जेहेर पी के आया
मौत है जो फिर भी ना आयी 
जीने का रुतबा तो गुम हो चुका है
बाकी है गम का गुरूर
दुनिया ने हमको ना जाना ना माना
हुआ हमसे कैसा कुसूर .....

नंगे पाँव दौड़ी चली आती है ,
मासूम-सी , नटखट भी -
आते ही यूँ लिपट जाती है
बिन बुलाई ,मनचली ,
ना जाने कौनसा हक़ जताती है 
भीड़ में रहूँ या तनहा -बेखबर रेहेती है
सिलवटों में छिपी ईक दास्ताँ ,
फिर से सुनाती है -
लफ़्जों की जरूरत उसे कहाँ -
वो तो ओंखों से केहेती रेहेती है 
बिन बारिश भीग आती है ,
गीली मिट्टी-सी मेहेक जाती है
हमको हमीसे चुराके, मीठी- सी चुभती है...
फिर किसी के पास ,बहुत पास बिठाकर
खुद चुपके से चली जाती है 
वो एक याद - नंगे पाँव, यूँही चली आती है...

Samartha Nagar

एक सायली चा मांडव
एक मोगऱ्याचा बगीचा
आता तिथेच कुठेतरी
कोरडा वाळलेला ताटवा
एक अंगणातली तुळस
एक ठिपक्यांची रांगोळी
आता तिथेच कुठेतरी
दोन डोळयांची सांडणी 
एक कोपऱ्यातील विहीर
एक धुण्या-भांड्याचा चौथरा
आता तिथेच कुठेतरी
ओल्या मनाचा शिडकावा 
एक ओट्यावरची खुर्ची
एक अगत्याचे स्मित
अगं तिथेच अजून तिथेच बघ
माझ्या बालपणीचे गीत....
We moved into 38 Samartha Nagar that summer of 82 - a house with a huge garden and an open terrace, then on the outskirts of Nagpur settled close to a railway line- quite a magical and romantic place for an eight year old when you add in a dog like 'Tiger' to the mix !
Baba ensured the garden turned into an enchanted one almost, with all kinds of flowers at the front and vegetables in the backyard.
My first introduction of the fragrant flowers began there - mogra, sayli, jai, jui, chameli, shevanti, kunda,madhumalti, aboli- name it and it was there....hours were spent plucking the flowers and turning them into 'gajre' and 'mala'! Beneath those 'velenchi mandav' a lot of books were read, friendships forged, secrets shared, bonds made and broken and remade...
And slowly we were also forging eternal bonds with our neighbours next door - 39 Samartha Nagar - as similar in structure and as different in character as possible!
Nana -Vahini , as even their daughters called them by this name, were a couple older to my parents by a generation almost. They were a family of four with 2 daughters, just like ours; but that's where the similarity ended...Their life was run meticulously within the boundaries of a well crafted frame - Nana was a government officer and Vahini an assistant principal with a popular local school. Everyday Vahini would be up in the wee hours , her 'sada- rangoli' routine never interrupted even during viral bouts...then the respective school and office runs. 
Vahini would walk back in the afternoon whatever the weather and exactly at 5pm Nana would be seen cycling down. Every evening Vahini would make something special for tea and then Nana would be seen sitting on his chair on the 'ota' in the garden welcoming a stream of visitors- all from different walks of life , some coming for a chat, some for advice and some just to feel good...
And although I didnt know it then, these two people and this family were providing stability and gravitas to me amidst all the dynamic and vibrant years my family was witnessing..Aai baba were trying to reconstruct our lives after an unfortunate tryst with destiny yet given their social and warm nature , our house was never short of fun and friends and all the chaos that it brought!
As with everything else, time had it's own journey- we girls were preparing to fly out of the nest - each success , each achievement shared and celebrated by the families as one household; each wedding leaving the others behind to look forward to the 'maherpun ' visits until finally I as the youngest was the only one left behind.
We moved house soon after. Tiger died of old age and we couldn't bear to live in that house anymore without him.Saying goodbye to the flowers was the hardest part....
But that didn't change our association with Samartha Nagar. Nana Vahini were always there; the tall gate with its jingling sound, the garden, the well, that ota - nothing changed not even when years later I returned with Vikas and the children - Nana was still sitting on that chair on that ota and Vahini with all the limitations that her age ensured, was still bustling out of the kitchen door to make tea for us.
I knew in my heart that was probably the last time I would see Nana and even as they urged me to be brave and come back soon, I kept craning my neck as I left the house to assimilate and hold on tightly to that picture one last time- Nana on the chair and Vahini by his side waving us good bye... 
Nana passed away soon and Vahini followed closely...The house stood stoic but without its rangoli. The decision to sell it to a builder followed as a practical neccesity and the next time I went to visit, it was a busy building site.
Tears streaming down my eyes I stood nervously in front of the houses-both no longer ours - only to be comforted by my 8 year old - "think mum, there are so many people waiting to make this their home now". Such is the wisdom of the innocent...
And I came away with a silent blessing to whoever would come and live there- may the happiness we experienced here be yours too...this is your home - I free it from the belonging I feel for it - I free it so it becomes yours....this building is no longer mine for the house I have etched in my mind will always be there- 38 and 39 Samartha Nagar - with a beautiful garden, velinche mandav, Vahinichi rangoli , a vihir and an ota with Nana in the chair.....

Sunday, 30 September 2018

किती छान असेल ना राधा असणं
रुक्मिणी आधी हक्क मिळणं
मीरेची भक्ती नाही,  कॄष्णेची विरक्ती नाही
तरी  तिच्या तुळेत कुणीच नाही...

किती छान असेल ना राधा असणं
फक्त प्रेम धुंदीत जगणं!
वाट बघण्याचा तोष नाही, असूयेचा दोष नाही
.....अढळपदाची स्पर्धाच नाही

किती छान असेल ना राधा असणं
घुंगर बांधून बेफ़ाम नाचणं
पावरीचा शोध नाही,  सुरांत कधी प्रदोष नाही
....रासलीलेला अंतच नाही

खरच छान असेल का राधा असणं ?
जपात नाव पहिले उठणं?
इतकं सुंदर, इतकं पूर्ण....
सर्वांपासून वेगळच जगणं

कुणास ठाऊक, कसं ओळखावं
कल्पनेवरून कसं ठरवावं?
राधा अशी, राधा तशी
राधा मला कळणार कशी...
तिला गवसायला, तिला उमगायला
मनातलं सारं तिच्या समजायला -

कॄष्ण भेटायला लागतो ......
Radhika turned 18 yesterday and as if every single feeling and emotion of the past 18 years enveloped into that one moment when I felt - "the umbilical cord breaks finally"...

But does it ever ? Because at that very moment, I wanted to be with my aai- back into her folds, back to being her baby so I could get an assurance from her that my baby would be fine as she steps out on her own !

 Strange is the mind but stranger are the ways it weaves relationships....

तिची दुनिया सोनसळी, स्वप्नपंखही चंदेरी
तिचा उल्हास मोहक , दृढ विश्वास सोबत
ह्या खुळ्या वयाची  सावली,  थोडी मलाही आठवली
माझं पिल्लू मोठं झालं, आणि, आईगं,  मला तू लागली...

पुन्हा अल्हड मी व्हावं,  नवं स्वप्न रोज पहावं
तुझ्या मिठीच्या मायेत पुन्हा  सुखाने निजावं...
तेवढ्यात हाक तिची येता, खर्या जगात मी आली
झाले आई तिची, पणं ,  आईगं , मला तू लागली...

तुझा जीव माझ्यात रमला,  माझा तिच्यात रुजला
तुझा उंबरठा ओलांडून तिला विसावा मी दिला
पिल्लू घरटे सोडून उडू पाहतय सकाळी
तिला निरोप देताना पण,आईगं,  मला तू लागली...

जे जे तू पेरलंस,तिला दिलं ते मी सारं
सुख वेचत रहावं,  दुःख शोधू नये फार
जपावी गं नाती, मनं सांभाळावी हळवी
तिला बळ देता देता, पण,आईगं,  मला तू लागली...

तुम्हा दोघींचा मी दुआ, आठवणी नव्या जुन्या
तीन पिढ्यांचा सोहळा, पुन्हा नव्याने रंगला..
तुझ्या अंशाची ही ज्योत, बघ तेजोमय झाली
आई मला तू लागतेसच, पण सांगू,
तिलाही तू हवी !

Adding a note because a poet I really admire (you know who you are :-) asked me this morning - " what does लागली mean ?" I then realised, it probably is a word that is associated with my childhood and my family only - लागली means, desperately needed, like भूक लागली ! :-))))
मृदु चंद्र असला जरी सांज वेळी
कुणासाठी आसूसते सूर्यफूल
प्रखर त्याची किरणे, दिनाचाच वाली,
परी उमलते फक्त त्याच्याच ठायी ?

निसर्गाचे चक्र कधी न चुकवता
कशी नियती स्वीकारते सूर्यफूल
सावली नकोशी, कोमेजते पावसात
जो दाह देतो, हासते त्याच पायी?

कपाळी असे का पूजिले हे समर्पण
कसा जन्म घेवून उगवते सूर्यफूल
दिवसा कसे ताठ मानेने फिरते, मग
 जाताच तो , का पडते उन्मळून?

सामान्य मनाला कसे रे सुचावे
कसा धर्म सांभाळते सूर्यफूल !
अस्तित्व साध्या फूलाचे जपाया
न चुकता उगवतो, जगी ऊब देतो- त्या एका फूलाचा तो एक नारायण  !

Friday, 17 August 2018

Demetia has been the subject of my study for the last year. Is this how it feels ?

Aren't we merely memories ?
Little tales, small snippets, some stories …
How would life be without connections
A blank canvas, no past, no recollections ?

A shackle free present, no idea of the past
No pain nor happiness – nothing to last
No pride to cherish, No wounds to nurse,
How would life be without them - better or worse?

Just living in the moment – how easy could it be?
Stranger or friend –not knowing who you see…
Not knowing who loves you or what gives you joy…
Not needing to forgive whoever made you cry….

No smells that can bring forth a childhood scene
Tiny treasures in boxes – but what do they mean?
No places to revisit, no paths oft trodden
Bonds deeply buried….quietly forgotten….

Pray give me the troubles, the sorrows of knowing
The perils of remembering, the broken heart crying
I am willing to carry the burden of truth
But let me have my identity, when I rest for good…

Thursday, 15 February 2018

Anniversary wishes

सखा - ही ओळखच किती गोड आहे 
नुसत्या नावामध्ये सुद्धा एक अनामिकशी ओढ आहे 
न बोलताच कळण्याची ,अबोलशी जाण आहे 
हलकंसं हसला जरी - संवाद परिपुर्ण आहे !
मनातलं सारं उमगावं , त्याच्या डोळ्यातच तो ठाव आहे
स्वप्नामध्ये वसलेलं असं दोघांचंच एक गाव आहे 
साऱ्या नात्यांहून सोवळा - त्याचा आगळाच एक मान आहे
न मागता दिलेला निरागस अधिकार आहे 
तो नसला जरी भवती तरी सुंदरसा भास आहे
मनामध्ये रुजलेला श्रीरंग तोच आहे 
ओळखीच्या गर्दीत तो एकटाच उभा छान आहे
मन मोकळं वागावं - मी त्याच्या सवे लहान आहे !
अंग अंग भिजले तरी उरलेली तहान आहे
पूर्णत्व नकोचरे.....हा प्रवासच फार गोड आहे 
छोट्या छोट्या आठवणीत हरवलेले क्षण
तिथेच कुठे अडकलेले हळवे नाजूक मन... 
कोवळ्या कोवळ्या किरणांमधून डोकावणारे कण
निष्फळ त्यांना बांधण्याचे पोकळ ते जतन !
झुळझुळणाऱ्या नदीच्या सोबत असतो काठ
पण पाणी पुढे व्हायले तरी राहतोच ना तो ताठ... 
गंध चोरून वारा वाहतो - घे ना भरून श्वास
फुलाला त्या खुडण्याचा का तो वेडा ध्यास !
लुकलुकणाऱ्या चांदण्यांशी साध जरा हितगूज
उगाच त्यांना मोजताना निजून जाशील तूच ! 
लपाछपीचा चंद्राशी खेळ ना एकदा डाव
मोट्ठ्या सारखं वागण्याचा निखळू दे ना आव... 
हुळहुळणाऱ्या जखमांशी ठेवतोस का रे नातं
दुःखच मिळतं जिथून ती धरावीच का वाट ?
चल गड्यारे , आला पाऊस, भीजून घेना चिंब.../ भीज  चिंब चिंब
कुणास ठाऊक कधी सुटावा मनकवडा संग !